Wednesday, October 14, 2009

मैत्री म्हणतात..........

मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर


होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर।

झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेलयावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर।

आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर

तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर

रोजच् आठवण यावी असे काही नाही,
रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही.
मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात,
आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

किरण



No comments: